सोलापूर:- वालचंद अभियांत्रिकी WIT ते कर्णिक नगर रोड वरील लाईट (पथदिवे) अनेक दिवसापासून बंद असल्याने पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना अंधारात चाचपडत फिरावे लागत असून पहाटे या ठिकाणी भटके कुत्रे नागरिकांच्या अंगावर येत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तरी या रस्त्यावरील लाईटचे बंद पथदिवे सुरू करण्यात यावी अशी मागणी या प्रभागातील नागरिकांनी केली आहे.तरी संबंधित विभागाने याकडे तत्काळ लक्ष द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.