ताज्या घडामोडी
‘गुलाब’ पाठोपाठ आता महाराष्ट्राला शाहीन चक्रीवादळाचा धोका
मुंबई : बंगालच्या उपसागरात आलेल्या गुलाब चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्राला अतिवृष्टीचा फटका बसला. त्याचच आता राज्याला शाहीन चक्रीवादळाचा धोका असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
पुढील काही दिवसात शाहीन चक्रीवादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर धडक देईल. अशा स्थितीत पुढील दोन-तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. कारण या दोन दिवसात छत्तीसगड आणि दक्षिण ओडिसामध्ये असलेले कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्र पर्यंत पोहोचणार आहे. भारतीय हवामान विभागानुसार ते 30 सप्टेंबर रोजी अरबी समुद्रावर पोहोचेल.
इथे आल्यावर ते आपले स्वरूप बदलण्याची शक्यता आहे. या वादळाच्या हालचालींवर हवामान विभागाच सतत लक्ष आहे.



