ताज्या घडामोडी
वातावरण बदलाचा फळबागांना फटका
तळेगाव : यंदा सर्वच हंगामातील पिकांवर निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम पहावयास मिळत आहे. दर पंधरा दिवसांनी होणारा वातावरणातील बदल शेतीसाठी धोकादायक ठरत आहे.फळबागांना याचा फटका बसत आहे.

फळबागांसह रब्बी हंगामातील पिके आणि कांद्यावरील किडीचा प्रादुर्भाव वाढणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे संकट उभे राहिले आहे.या हवामान बदलामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या वातावरण बदलाचा पिकावर परिणाम होऊन शेतक-यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.




